"मस्तवाल मित्र"


आयुष्यात एका सायंकाळी अचानक येतो एक "मस्तवाल मित्र"..! 
त्याच आपलं वेगळंच विश्व..!
स्वतःमधेच रमणारा..हसणारा अन हसवणारा…!
‘सगळ आयुष्य बदलून गेलंय’ अस असं म्हटलं तर नाटकी वाटेल, पण खूप काही नक्कीच हळू-हळू बदलू लागतं.
नेहमीच कामात गुंतून राहणाऱ्या आपल्याला सायंकाळच्या चहाची हटकून आठवण करून देणारा तो म्हणजे----
रागात विनाकारण वैतागायला हक्काचा माणूस..!
हवं तेव्हा रडून मन मोकळं करायला भक्कम आधार..!
कधी भल्या पहाटे उठून सूर्योदय पहायला वेडी सोबत तर कधी एका सायंकाळी त्याच टेकडीवर तासन तास संवाद साधणारा मुका सोबती..!
आपल्या सारखाच वेडी स्वप्ने पाहणारा… आपल्या वेड्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारा.. 
असा एक "मस्तवाल मित्र"..!
मग काय?
'दुनिया कि भीडसे  से दूर..हैराण..परेशान…' असणाऱ्या आपल्याला पुन्हा एकदा स्वतःच्या स्वप्नांवर.. स्वतःवर विश्वास वाटूलागतो.. पुन्हा नव्यानि काही स्वप्नं रंगवली जातात..  नव्या दमाने बेत आखले जातात.. अन कामाला सुरुवातही होते..
असा तो आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कधीतरी कुठे तरी येतोच… जगण्याच्या घाईत म्हणा अगर गत-काळाच्या चुकांमुळेम्हणाआपण त्याच्याकडे खुपदा दुर्लक्षच करतो.. तो हळूच येतो… खुपदा आपल्या नकळत आपल्यासाठी थांबतो.. गरज असते ती फक्त क्षणभर थांबून त्याचाशी हाथ मिळवायची…! मग काय Life मस्तचं होऊन जाते..अगदी आपल्या मस्तवाल मित्र सारखीच!

काही गोष्टी कधीच बदलत नाहीत


आज तुझ्याशी बोलताना.... त्या साऱ्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
काहीच बदललं नाही आपल्यातआपल्या नात्याशिवाय..!
आजही तू तसाच आहेस शांतअविचल,  तुझ्याचं जगात रमणारा.. स्वतःच्याच स्वप्नात हरवलेला.. तरीही आवर्जून आपल्या माणसाना जपणारा.. आणि मी...??? मी हि तर तशीचं  आहे अजून..
कधी कधी वाटत काय चुकलंकुणाच चुकलं?
जाऊ दे ना.. आजही आपल त्यावर एकमत होणार नाही...
आजही तेच संवाद....सवयीतले तेच शब्द...खूप बोलायचं असूनही  बोललं गेलेलं खूप काही आत आजही तसच खदखदत आहे पण मी बोलले नाही आणि तुही विचारलं नाहीस...
तरी आवर्जून मी म्हणालेच...'काही गोष्टी कधीच बदलत नाहीत'... त्यावर तुही म्हणालास 'कितीही प्रयत्न केला तरी...' पण मग ते नातंच नेमकं कस बदललं रे...?
निघून गेलास तू काहीच न बोलता...परत फिरून बोललाही नाहीस कधी मी बोले तोवर...
दिवसा मागून दिवस आणि वर्ष सुद्धा संपलीत अरे... पण आज...का कुणास ठाऊक सारख वाटत होत...
खरच काही गोष्टी कधीच बदलत नाहीत....
हो ना?


(असंच कधी तरी काहीतरी सुचत आणि न चुकता मी आवर्जून त्यासोबत लिहिते 'ह्याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही...' हे माहिती असताना कि तू कुठे तरी वाचून मिश्कील हसत असणार...हो ना?) 

खास...


सहजच बोलताना कानी पडलेला शब्द आणि विचार करता करता सुचलं काही,
------------------------------'खास'............

College चा कट्टा..
Collegeत असताना नेहमीचाच..
पण college च्या शेवटच्या दिवशी..

------------------------------'खास'........

News-Paper रोजचाच..
आपल्या Team नी करंडक जिंकावा
आणि त्यात तो छापून यावा..
------------------------------'खास'.......


नेहमीचीच चहाची टपरीनेहमीचीच वर्दळ,
एक वळवाचा पाउस आणि मित्रांनी सांगितलेला,
अजून एक cutting चहा..
------------------------------'खास'............


कामात गर्क असताना,
अवेळी वाजलेला Mobile ,
आणि जुन्या मित्राचा Call ,
------------------------------'खास'............


Radio वर वाजणारी गाणी अनेक
पण अचानक मनात गुन-गूनणार
गाण कानी पडावं....
------------------------------'खास'............




जुन्या आठवणीत,
जुन्याच पुस्तकात,
मैत्रीणीच पत्रं सापडाव,
------------------------------'खास'............
कपाटाच्या कोपरयात,
जुन्या दैनंदिनीत,
मागच्या पानावर खरडलेली
माझी पहिली कविता..
------------------------------'खास'............

आयुष्य असंच तर आहे अनेक छोट्या-छोट्या खास क्षणांनी बनलेलं..
------------------------------'खास'.......... ------------------------'अगदी खास'.......

हे बरय तुझ..



हे बरय तुझ...
मी रोज रात्री तुझ्यासाठी जागायचं,
अन 'सकाळी लवकर उठायचय' म्हणून तू खुशाल लवकर झोपायचं???
हे बरय तुझ...
तुला कधी दुखलं कि मी चिंतेने मर-मर मरायचं...
अन 'उगाच चिंता करते तू' म्हणत तू मलाच हिणवायचं???
हे बरय तुझ...
तुला काय आवडत ते मी नेहमी लक्षात ठेवायचं...
अन मला काय हवंय ते तू चुकून पण नाही विचारायचं???
हे बरय तुझ...
तुझी वाट पाहत मी तासन तास बसायचं...
अन 'वेळ नाही मला' म्हणत तू स्वप्नात पण नाही यायचं??? 

वास्तव

हसऱ्या चेहऱ्या मागच दुःख खूप विद्रूप असत...
यशामागच अपयश खूप दारून असत...
अगदी झगमगत्या दिव्याखालच्या अंधाराइतक हे गहिरं असत..